पहा ‘इंद्रायणी’ सोम ते शनि, संध्या ७ वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणी आता एक नवं वळण घेणार आहे. इंदूने मोहितरावांपुढे एक मोठं आव्हान स्वीकारलं आहे – “पुढच्या एका वर्षात विठूच्या वाडीत मी शाळा सुरू करून दाखवेन!” तिचं हे धाडस गावात नवा आत्मविश्वास निर्माण करत आहे. मात्र हे आव्हान पूर्ण करताना तिला अनेक संकटांना सामोरे जावं लागणार आहे.
इंदूच्या या स्वप्नात गोपाळ, अधू आणि गावातील फँटया गँग तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. पण याच दरम्यान मालिकेत एक भावनिक क्षण येतो – जो प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहे.
गोपाळ अखेर आपल्या प्रेमाची कबुली देतो!
मोहितराव इंदूवर हात उगारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा गोपाळ समयसूचकपणे तिथे पोहोचतो. इंदूला वाचवत तो मोहितरावला ठणकावून सांगतो –
“माझ्या इंद्रायणीवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन. कारण माझं तिच्यावर प्रेम आहे!”
ही कबुली ऐकून प्रेक्षक थक्क झाले आहेत. पण गोपाळचं हे धाडस इंदूच्या मनात काय भावनांचा कल्लोळ निर्माण करेल? तिला अधूही आवडतो का? की गोपाळचं प्रेम तिच्या हृदयाला भिडेल? या सगळ्याचं उत्तर मिळणार आहे इंद्रायणीच्या पुढील भागांमध्ये.

मोहितरावच्या अपमानाचा सूड – इंदूच्या वाटेत अडथळ्यांचा डोंगर
इंदू आणि व्यंकू महाराज मोहितरावचा खरा चेहरा कीर्तनातून गावासमोर उघड करतात. त्यामुळे संतप्त झालेला मोहितराव आता इंदूच्या स्वप्नांचा संहार करण्याच्या प्रयत्नात आहे. शाळा सुरू करण्याचं तिचं स्वप्न तो चिरडून टाकू पाहतो.
पण या संघर्षात इंदू एकटी नाही – तिच्या पाठीशी आहे गोपाळ, अधू, व्यंकू महाराज आणि गावातील लहानग्यांची ‘फँटया गँग’. त्यांच्या साथीने इंदू शाळा सुरू करणार का? गावात शिक्षणाची नवी पहाट कशी उगवेल?
प्रेक्षकांसाठी ही मालिका ठरणार आहे अधिक रंजक, भावनिक आणि प्रेरणादायी.
प्रेम, संघर्ष, नातेसंबंध आणि सामाजिक बांधिलकी यांचं सुंदर मिश्रण पाहण्यासाठी इंद्रायणीचे पुढील भाग चुकवू नका.