जयदीप-गौरीच्या लग्नाचा शाही थाट | सुख म्हणजे नक्की काय असतं

स्टार प्रवाहच्या सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत गौरी – जयदीपच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने सुख येणार आहे. आता दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबूली दिली आहे आणि आता दोघेही पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. शिर्केपाटील कुटुंबात प्रत्येक समारंभ नेहमीच खूप थाटामाटात पार पडतो. म्हणूनच गौरी आणि जयदीपचं लग्न सोहळाही अगदी शाही थाटात पार पडणार आहे. अगदी प्री-वेडिंग फोटोशूटपासून ते मेहंदी, संगीत, हळद आणि वरातीपर्यंत सगळा थाट लग्नात पाहायला मिळणार आहे.

नऊवारी साडीत गौरीचं सौंदर्य अजूनच खुलून आल आहे. तर जयदीपही धोतर, फेटा अश्या पारंपारीक पेहरावात दिसणार आहे. माई – दादा गौरीला मुलीप्रमाणे मानतात. त्यामुळे लग्नात गौरीच्या आई – वडिलांची जबाबदारी माई – दादांनीच पार पाडली आहे. या सगळ्यात विशेष लक्ष वेधून घेतय ते म्हणजे गौरीचं मंगळसूत्र. जयदीपच्या प्रेमाची निशाणी असलेलं मोरपीस गौरीनं लहानपणापासून जपून ठेवलं होतं. हीच निशाणी तिच्या मंगसूत्रातही जपली जाणार आहे. जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा हा शाही थाट पाहण्यासाठी पाहायला विसरू नका, सुख म्हणजे नक्की काय असतं, रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

 

Jaydeep And Gauri Wedding Sukh Mhanje Nakki Kay Asta