‘अबीर गुलाल’ मालिकेत नाट्यमय वळण

शुभ्रा-अगस्त्यच्या साखरपुड्याच्या निमित्ताने नवीन ट्विस्ट

कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ सध्या एका नाट्यमय वळणावर आली आहे. शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा थाटामाटात पार पडणार आहे, ज्यामुळे मालिकेत नवीन ट्विस्टची सुरुवात होणार आहे. मालिकेतील मुख्य पात्र शुभ्रा, अगस्त्यसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास सज्ज आहे. पण या साखरपुड्यामुळे श्रीच्या भावनांना मोठा धक्का बसणार आहे, कारण श्रीने अजूनही अगस्त्यकडे आपले प्रेम व्यक्त केलेले नाही.

श्रीला तिच्या सत्याची जाणीव झाल्यानंतर, ती शुभ्राला त्रास होऊ नये म्हणून आपल्या हक्काचं घर सोडण्याचा निर्णय घेते. श्रीच्या या निर्णयामुळे अगस्त्य अस्वस्थ होतो आणि तो आपल्या आईला सांगतो, “जोपर्यंत श्री सापडणार नाही, तोपर्यंत मी साखरपुड्याला उभा राहणार नाही”. त्यामुळे साखरपुडा पुढे ढकलला जातो. अगस्त्य रात्रभर श्रीला शोधतो आणि अखेर तिला घरी घेऊन येतो.

मात्र, या सगळ्या घडामोडींमध्ये एक नवीन रहस्य उलगडतं. शुभ्राने मागवलेल्या डीएनए टेस्ट रिपोर्ट्समुळे श्री ही गायकवाड कुटुंबाची खरी मुलगी असल्याचं समोर येतं. हे सत्य कळताच शुभ्राला मोठा धक्का बसतो, पण श्री घरी परतल्यानंतर शुभ्रा आणि अगस्त्यचा साखरपुडा अखेर पार पडतो. श्रीने मात्र तिचं अगस्त्यवरचं प्रेम मनातच ठेवायचं ठरवलं आहे.

शुभ्रा आणि अगस्त्यच्या लग्नात कोणतंही विघ्न येऊ नये, यासाठी श्री सुलोक्षणा निंबाळकरांना प्रॉमिस करते. परंतु, मालिकेतील पुढील घडामोडी काय असणार? शुभ्रा आता कोणता नवा डाव खेळणार? अगस्त्य आणि शुभ्राच्या लग्नात नव्या अडचणी येणार का? की शेवटी श्री आणि अगस्त्यच एकत्र येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘अबीर गुलाल’ ही मालिका नक्की पाहा, सोमवार ते शनिवार, रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर, आणि कधीही @OfficialJioCinema वर.